Skip to main content

बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका

*बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे  पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ' १५५२६०'   हा नंबर करा डायल*

*काही मिनिटांत आपली  रक्कम होल्डवर जाईल*

सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे  कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. 
कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात.
 कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. 
त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

*यंत्रणा काम कशी करते?*

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते.
 त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. 
याकामी आर.बी.आय.चेही सहकार्य मिळत आहे.
 क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. 
आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. 
याला 'इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म' असेही म्हणतात. 
याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्सu संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या खुप  संस्था जुळलेल्या आहेत.
➖➖➖➖ ➖➖➖

Comments

Popular posts from this blog

अक्षय तृतीय च्या सर्वाना शुभेच्छा

अक्षय तृतीय च्या सर्वाना शुभेच्छा 

केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे

*ऩियतीने अखेर  फास आवळला* 😔  *दक्षिण अफ्रिका या देशातील* मुख्य शहर *केपटाऊन* हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे, त्यांच्या सरकारने 15 डिसेम्बर 2021 नंतर पाणी पुरवठा करू शकणार नाही म्हणून असमर्थता दाखविली आहे. अखेर जगाचा दु:खद प्रवास सुरू होण्याची ही वेळ कोणावरही येईल.पाणी जपून वापरा. पाण्याची नासडी थांबवा. *आपण देखील लातुरला रेल्वेने पाणी आणलं होतं.जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे.* 😔 ग्रुप मेंबरना आवाहन !!!      🙏    नमस्कार   🙏              जवळच्या सर्वच धरणातील पाणी कमी झाल्याने भूगर्भातील पाणी पातळी खोलवर गेली आहे.तेव्हा    आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करु शकता:- 1. रोज गाड्या धुवू नका. 2. अंगणात रोज रोज पाणी मारू नका.  3. सतत नळ चालू ठेऊ नका. 4. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करुन त्यायोगे पाणी वाचवूया. ५) घरातील गळके नळ रिपेअर करा ६) घरातील गळकी टाकी , पाईप , बॉल कॉक रिपेअर करा..... ७)उघड्या नळाला तोटी लावा,आपले पाणी झाल्यावर नळ बंद करा,..पाणी नालीत सोडू नका🙏 8) कालच पाणी शिळ म्हणून ते ऊबङू नका,, 9) नळाच्या प

छत्तीसगड येथे नक्षलवादी गोळीबार हल्ल्या मध्ये गौडगाव चे सुपुत्र शहिद मेजर रामेश्वर काकडे भावपूर्ण श्रद्धांजली